Tuesday, 10 October 2017

असंख्य मनातील काहूर



                लहानपणापासून बालमनाला विविध प्रश्न पडतात,सूर्य,चंद्र,ग्रह,तारे,अंतराळ इतपर्यंत ठीक होत.पण हे चंद्रग्रहण,सूर्यग्रहण हजारदा वाचून पण ते सावलीचे खेळ त्या वयात न समजणारेSp355847@gmail.com देखील आज आहेतच की जिवंत.गावाला जाताना वाटायचं ह्या दूर डोंगरावर विजेचे मोठयाले खांब नेमके कुणी बसवले असतील?,चंद्र आपल्या गाडीसोबत कसा धावतो?,कोंबडी आधी की अंड?,बाईच्या पोटात नेमकं बाळ येत कुठून?ते बाहेर कस पडत असेल?शिवू नको म्हणजे काय?आमच्यात हे चालत,तुमच्यात नाही☺हे आमचे तुमचे कोण?लोक नाव ठेवतील ,ही नाव ठेवणारी लोक नेमकी कोण?,बाईला वय विचारू नये,पुरुषाला पगार हा महान शोध लावणारा कोण?वयाने मोठी व्यक्ती सांगतात ,"खोट बोलू नये.पण वय वाढत तस कळत हीच लोक जास्त खोट बोलत आहेत.व्यभिचार करू नये ,पण नेमकं काय म्हणजे व्यभिचार?सगळ्या धर्माची शिकवण मानवतेची तरीही मानवी नैतिकता शिकण्यासाठी धर्मच का हवाय?एक ना अनेक प्रश्न सतत मन विचारत राहत.हे मन नेमकं काय?ते राहत कुठे?दिसत का नाही?,वैरी न चिंती, ते मन चिंती?म्हणजे नेमकं येणारे नकारात्मक विचार का?कुठून ह्या डोक्यात घोळत असावेत.
                       मुंबईसारख्या ट्रेनच्या वेगाने धावणाऱ्या लोकांकडे पाहून खरंच नवल वाटत.वयवर्षे साठ नोकरी केल्यावर,निवृत्तिनंतर देखील त्याच वेळेला घरातून निघून फलाटावर गाड्याची ये जा पाहणारे असंख्य सुरकूतलेल्या नजरा असो की नुकतच तारुण्यात प्रवेश केलेली युवक युवती असो.सतत शून्य नजरेने पुलावर उभे राहून नेमके काय शोधत असावेत?,एखादे लहान मूल घरीदारी एकटाच भिंतीशी,बाहुलीशी बोलताना दिसत.वयस्कर मंडळी टीव्हीसमोर बसून गेलेले दिवस आठवू पाहतोय.तर पंचेचाळीशी गाठलेले तारुण्य निसटून गेलं म्हणून हळहळताना दिसतोय.रेल्वेची घोषणा सुरू असते,रेल्वेतून उतरताना,गाडी व फलाटाच्या अंतराकडे लक्ष द्या.तरीही अपघात होतोय,माणसे विचारात चालत्या ट्रेनमध्ये चढतोय ,उतरतोय.नेमकी ही उलटी क्रिया करताना कोणते विचार मनात गोळत असावेत?मोबाईल मध्ये विविध गेम खेळत खर तर आपला अमूल्य वेळ वाया जातोय समजताना त्यातून हरणे,जिंकणे नेमके कुणाशी सुरू असते.
                    पूर्वी मामाचे पत्र हरवले,ते मला सापडले.हल्ली मन मोकळं करायला हा मामा,काका, आत्या होते आता जागेअभावी विभक्त झालेत. व माणूस एकाकी पडत चाललंय.आपला आनंद फक्त नवरा बायको,हम दो, हमारे दो, पुरता सीमित झालाय.आठवड्यातून एकदा सिनेमा,पिटझा पार्टी,एक दूर पिकनिक,मॉल मध्ये खरेदी म्हणजे जगतोय का?ह्याचा खरच विचार करण्याची वेळ आलीय.तो क्रोकोडाइल हंटर आपण डिस्कवरी वाहिनीवर पाह्यचो.त्याचा अंत देखील त्या शोधपायीच झाला.भुंगा कमळात मध शोधत त्यात त्याचा मोहापायी अंत होतो,पतंग दिव्याच्या प्रकाशाला भाळतो,अंत त्याच दिव्याच्या वातीत होतो.मानव निश्चित ह्यापेक्षा वेगळा आहे.जे क्षण गेलेत ते पुन्हा येणे नाही,भविष्याचा अति विचार करून उपयोग नाही.माणसाच्या क्षणाचा भरवसा देणं कठीण होत असताना.मोकळेपणाने ,आपलेपणाने एकमेकांशी घरीदारी मुक्त संवाद होणे,शारीरिक ,मानसिक गरजा स्वतः स्वतःच्या शोधून स्वमर्यादा एकदा उमजल्या की नक्की आपल्या नजराही शून्यात न लागता अधिक बोलक्या होतील.
मनातील भाव प्रकट केल्या न मन अगदी प्रसन्न होत तुम्हाला नक्कीच आवडेल  एकदा आपल्या ही भावना मनमोकळेपणाने सांगा असे वाटते
sp355847@gmail.com

No comments:

Post a Comment

विवाह एक भीषण परिस्थिती...

    पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशव...