Sunday, 14 October 2018

अंत्ययाञा

*" एका कवीची अंत्ययात्रा "....*

हो खरी आहे ती गोष्ट.रात्री अपरात्री तो दचकून  ओरडत उठायचा म्हणे अंथरुणावर.
तेंव्हा सारं घर जागं व्हायचं म्हणे त्याचं.
जेंव्हा त्याची आई त्याला जवळ घेऊन थोपटायची तेंव्हा.
सगळाच्या सगळा तो आईच्या पदरात रिता व्हायचा.
मग पाठीवरून  फिरणाऱ्या आईच्या हातांनी त्याला धीर यायचा.
*सालं रडलं नाही लढलं पाहिजे.*
बाबा सांगायचे त्याला.
*तू स्वतःच्या भावनांशी युद्ध कर पोरा.* तेंव्हाच तुला बरं वाटेल.
बाप चुलीतली राख त्याच्या डोक्याला फासत म्हणायचा.
त्याच्या राखेत शेकडो देव देवतांचा आशीर्वाद होता म्हणे.
मग जास्तच त्रास व्हायला लागला...
कि तो जवळ वही ओढायचा.
पेनाने भरभर लिहून काढायचा काही बाही.
तेंव्हा मात्र तो मोकळा व्हायचा.रिता व्हायचा.
निर्मळ व्हायचा.गंगेच्या पवित्र पाण्यासारखा.
हल्ली त्याला वेडाचे झटके हि येऊ लागलेत.
आई काळजी करत बसायची.
देव पाण्यात ठेवायची.आणि बाप डॉक्टर शोधत असायचा.
खरंतर त्याचा विकार मानसिक होता.
त्या वेदनांशी झगडतांना तो थकला कि लोकांना फिजिकली वाटायचं...
की तो नक्कीच वेडा झालाय.
पण तसं नव्हतं काही.
खूप वर्षापूर्वी त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं.
पण ते सक्सेस मात्र झालं नाही.
ती अर्ध्यात डाव सोडून गेली.
तेव्हापासून त्याला असं होतं.
डॉक्टर हल्ली त्याला झोपेची इंजेक्शन देतात.
गोळ्या देतात.
पण ते जाणिवांचा औषध देत असतील.
पण नेणिवेचं काय?
त्याला आहे का काही औषध?
आठवणी....
काही केल्या तरी जात नाहीत मनातून.
तेंव्हा खरा दुःखी होतो माणूस.
काळाचा मलम प्रेम केलेल्या व्यक्तीवरच्या जखमेची भरती नाही करू शकत.
ना कि वेदनेची.
या वेदनेला औषध नाहीच.
म्हणून लोकं एकटी राहत असतात प्रेमात पडल्यावर.
त्यानेही असंच केलं होतं काहीसं वेडं प्रेम.
तेंव्हा तिच्यासाठी समाजाबरोबर दोन हात करायची हिम्मत त्याच्यात नक्कीच वाढली होती.
सगळ्या जगाशी लढण्याची भाषा करणारा तो..
हल्ली गप्प गप्प असतो.
ती गेली...
सारं संपलं. असाच बडबडत असतो तो हल्ली.
परवा त्याच्या कवितांना खूप मोठा पुरस्कार मिळाला.
पण तो गेला नाही कार्यक्रमाला.ना त्याने गाव सोडलं.
तो फक्त इतकंच म्हणत राहिला.
*प्रेम होणं या पेक्षा जगात कुठलाच पुरस्कार मोठा नाही.*
कधी कधी असं बोलून तो ऋषितुल्य वाटायचा मला.
प्रेमात पडल्यावर अर्ध्यात डाव मोडलेल्या कित्येक  व्यक्ती मी जेंव्हा बघतो.
तेंव्हा ते अतृप्त मृतात्म्या सारखे वाटतात मला.
जगात प्रेम आहे रे...
पण ते मिळवायची धमक पाहिजे.
किती सुंदर वाक्य सांगून गेला होता तो दुनियादारी मधला ऍक्टर.
पण कुणाला आजवर खरं प्रेम मिळालंय.?
अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं यशस्वी झाली.
पण बाकीच्यांचं काय?
त्यांनी कुठे मांडावी आपली वेदना...आपलं दुःख.?
सगळं जग प्रेमरोगी झालंय.
तरीही या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
काल तो अचानक गेला.याची जेंव्हा मला खबर मिळाली तेंव्हा...
जेवता जेवता माझा हात आपसूक थांबला.
तसाच हात धुऊन मी त्याच्या घराकडे धावलो.
खूप मोठी गर्दी झालेली.
*त्या गर्दीत त्याच्यासाठी आलेले दर्दी किती होते?*
सांगणं मुश्किल होतं.
त्याची आई...त्याचे बाबा ..त्याच्यासाठी रडत होते.
तेंव्हा मला आतून गलबलून आलं.
*कवीने असं प्रेमात कधीच मरु नये.* त्याला सरणावर घालतांना थरथरलेला त्याच्या बापाचा हात...
माझ्या नजरेतून सुटला नाही.
तो मात्र इथून सुटला.मोकळा झाला मोह मायेतून.
चांगलं झालं त्याचं.
त्याच्या  चितेने पेट घेतल्यावर लोकं माघारी वळली.
*एका कवीच्या अंत्ययात्रेला आली होती ती.*
लोकं फक्त स्मशानापर्यंतच.एव्हढं मात्र नक्की कळलं मला.
आता स्वर्ग वगैरे असला तर त्याची प्रियेसी त्याला मिळेल का?
हा पोरकट प्रश्नही येऊन गेला माझ्या मनात.
मिळेल मिळेल...नक्की मिळायला हवी.
मी आभाळाकडे हात केले.
प्रार्थना केली त्या देवाला.
एका कवीला स्वर्गात सुखरूप घेऊन जा रे बाबा....
आणि.....
काहीतरी अचानक आठवलं म्हणून मी खिशात हात घातला.
त्याच्याच कवितांची चिट्ठी होती ती.
उघडली मी...
वाचून काढली शेवटची..
तेंव्हा सुरेश भट्टांचे काही शब्द आठवले मला...

*इतकेच मला जातांना...*
*सरणावर  कळले होते.*
*मरणाने केली सुटका...*
*जगण्याने छळले होते.*

मी डोळे पुसले.कागद व्यवस्थित घडी केला.
एकवार जळणाऱ्या चितेकडे पाहिलं.
आता ती आग...एका कवीला जाळत होती.
मी अलगद ती चिठ्ठी त्याच्या चितेवर फेकली.
आणि नमस्कार केला.
सूर्य केव्हांच मावळला होता.
आता तो कवी फक्त कवितेच्या रूपाने लोकांच्या मनात जिवंत राहणार होता.
सांजेची छटा क्षितिजावर दिसू लागली होती.
आता मलाही माणसांच्या जगात परत जायचं होतं.
मी उभा राहिलो आणि चालू लागलो मागे न बघता.
चितेने आता मोठयाने पेट घेतली होती.

*दत्तात्रय गुरव.*✍
*संपर्क--८६०५५२३६१८.*
             *७०२८१७५१५८.*


No comments:

Post a Comment

विवाह एक भीषण परिस्थिती...

    पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशव...