Thursday, 18 October 2018

धक्का

                          ' धक्का '       




              धक्का हा शब्द ऐकून.क्षणभर धक्का बसल्यासारखे वाटतं किंवा दे धक्का चित्रपट आटवला असेल किंवा आपल्याला बसलेला लहानमोठा धक्का आठवला असेल नाहीतर धक्का न लागता काहिही वाटलं नसेल ,अशी आपली अवस्था झाली असेल.पण प्रत्येकाने कुठे ना कुठे धक्का खाल्लेला असेलंच.तसंतर आज अवघं जीवनंच धकाधकीचे झाले आहे .त्यामुळे धक्काच बसत नाही असं काही नाही पण जाणवण्याची संवेदना हरवून बसलो आहोत आपण.

             पुर्वी लोक सावकाश, शांत,स्वस्थ,संयमी ,नियम व नियंत्रित जगायची.आजच्याइतकी धावपळ नसायची जगण्यात .त्यामुळे आवर्जुन धक्का देणारे धक्याला बुक्की असे खेळ खेळले जायचे,फार फार तर बंद पडलेले ट्रक, ट्रँक्टर,बस जीप इ.वाहनाना धक्का देताना आम्ही पाहायचो.हां काहीजण ही वेळ येऊ नये म्हणून वाहन बंद करतानाच उताराला उभी करण्याची हुशारी करुन उताराचा धक्का घ्यायची.फँनमध्ये कधी काही बिघाड झाला कि थोडा धक्का काटीच्या सहाय्याने दिला जाई.मग तो फिरायचा,तसा गावचा बाजारहाट,यात्रा,जत्रा सण उत्सवात धक्काबुक्की व्हायची पण वाद व्हायचे नाहीत सहनशीलता बरी होती आज प्रचंड धक्के खात देत आपण जगतो,घराच्या बाहेर पडलो की,धक्का खायची तयारी ठेऊनंच पडावं लागतं,पुणे मुंबई रेल्वे स्टेशन तर आपणास गर्दीच धक्के देत पुढे सारले जातो असंच वाटतं आणि आपल्या सारख्याला गड्या आपला गावंच बरा वाटायला लागतो.हाही एक धक्काच असतो. कारण गावात असताना मुंबई दुरुन फार सुंदर दिसते ना.

                   आपलं जीवनही सुखदुःखाच्या.धक्यानेच पुढे पुढे जात असते,कधी सुखद,तर.कधी दुःखद, कधी वाहणाच्या धक्यानी आयुष्यातून उठतो तर कधीवेळेवर मिळाल्यानेच जीवन दान मिळते.नोकरी,व्यवसायात अदेक चांगलेवाईट धक्के बसत राहतात.कधी आपलीच माणसं धक्कादायक वागताना दिसतात तर कधी परकी माणसं आपणांस सुखद धक्का देतात.आजचं युग हे धक्याधक्याचं आहे.धक्का म्हणजे मालसामान उतरा यची बंदराची जागा,धक्का म्हणजे नवल वा आश्चर्य,धक्के खाणे म्हणजे अनुभव घेणे,धक्याला लागणे म्हणजे इच्छित स्थळी पोहोचणे.धक्का म्हणजे शॉक ,धक्का म्हणजे अपेक्षित वा अनपेक्षित घटना अकस्मित घडणे होय.असा हा छोटा वाटणारा शब्द कधी दुःखाचा डोंगर आपल्यावर टाकतो,कधी न पचणारी संकंटं देतो तर कधी सुखावून टाकतो.असं म्हणतात तेच खरं.

                  सुखी स्वस्त मस्त रहायचं,जगायचं असेल तर धक्याला बुक्की चा खेळ न करता बुद्धीचा वापर करून शांत रहा,सुखी रहायचं असेल तर हमरीतुमरीवर न येता पचवाव्या लागतील काही गोष्टी मग असे धक्के फार नाहीत जाणवणार,हाच आहे आपला आजचा धडा वाचा व विचार करा नाहीतर जराजराशा धक्यानी व्यतीत व्हायची वेळ येणार नाही. कारण कोणताही प्रश्न वा परि स्थिती युद्धापेक्षा बुद्ध,कबीर,महावीरांच्या शांतीची गरज आहे.धक्का द्यायला ताकत लागत नाही पचवायला ताकत लागते ती कमवावी लागेल ,हे वाचून कदाचित धक्का बसेल पण सुखी जीवनाचा हा राजमार्ग आहे.करु प्रयत्न जमेल सारं नाहीतर धकाधकीचे जीवनही अधिकच धक्के खात जगावं लागेल ,विचार करा,पदव्या घेताना मिळालेलं ज्ञान व्यहारात आणू या.त्यासाठी एक धक्का स्तःला जरुर द्या व आपली जीवन नौका धक्याला लावा.वाचा विचार चिंतन करा.लागा कामाला....

रेशीम गाठी

*रेशीमगाठी......*

तिन्ही सांजेने रंग उधळला...
त्या क्षितीजाच्या काठी.
सुगंध होऊन पवन दरवळे...
झाली सुगंधित माती.

लाल राक्तिमा गाली येऊन..
शृंगार सखीचा सजला.
तिचा प्रियकर कृष्ण होऊनी...
यमुने काठी दिसला.

अवखळ झाल्या रेशीमगाठी..
बंध विरहाचे तुटले.
ते दोघे मग प्रियकर होऊन.
एकमेकांना झटले.

तुला स्पर्शिता कमल हातांनी..
वेग वाऱ्यावर स्वार व्हावा.
सांग सखे या यौवणाचा..
का तुलाच भार व्हावा.

श्वास फुलवता पेट पेटला..
त्या मन द्वाराचा अग्नी.
रंग उधळले लाजेने हा...
कसा पेटला कामाग्नी.

त्या आभाळा अंत नसावा.
तशी असावी प्रीती...
समय सरावा मंदगतीने..
नसे कोणाचीच भीती.

तृप्त तृप्तीचा भास सखे हा...
प्रेम पुरावा होतो.
शिडकाव स्वरांचा तनुवर होता...
मी तुझाच होऊन जातो.

शिडकाव स्वरांचा तनुवर होता...
मी तुझाच होऊन जातो.










Sunday, 14 October 2018

अंत्ययाञा

*" एका कवीची अंत्ययात्रा "....*

हो खरी आहे ती गोष्ट.रात्री अपरात्री तो दचकून  ओरडत उठायचा म्हणे अंथरुणावर.
तेंव्हा सारं घर जागं व्हायचं म्हणे त्याचं.
जेंव्हा त्याची आई त्याला जवळ घेऊन थोपटायची तेंव्हा.
सगळाच्या सगळा तो आईच्या पदरात रिता व्हायचा.
मग पाठीवरून  फिरणाऱ्या आईच्या हातांनी त्याला धीर यायचा.
*सालं रडलं नाही लढलं पाहिजे.*
बाबा सांगायचे त्याला.
*तू स्वतःच्या भावनांशी युद्ध कर पोरा.* तेंव्हाच तुला बरं वाटेल.
बाप चुलीतली राख त्याच्या डोक्याला फासत म्हणायचा.
त्याच्या राखेत शेकडो देव देवतांचा आशीर्वाद होता म्हणे.
मग जास्तच त्रास व्हायला लागला...
कि तो जवळ वही ओढायचा.
पेनाने भरभर लिहून काढायचा काही बाही.
तेंव्हा मात्र तो मोकळा व्हायचा.रिता व्हायचा.
निर्मळ व्हायचा.गंगेच्या पवित्र पाण्यासारखा.
हल्ली त्याला वेडाचे झटके हि येऊ लागलेत.
आई काळजी करत बसायची.
देव पाण्यात ठेवायची.आणि बाप डॉक्टर शोधत असायचा.
खरंतर त्याचा विकार मानसिक होता.
त्या वेदनांशी झगडतांना तो थकला कि लोकांना फिजिकली वाटायचं...
की तो नक्कीच वेडा झालाय.
पण तसं नव्हतं काही.
खूप वर्षापूर्वी त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं.
पण ते सक्सेस मात्र झालं नाही.
ती अर्ध्यात डाव सोडून गेली.
तेव्हापासून त्याला असं होतं.
डॉक्टर हल्ली त्याला झोपेची इंजेक्शन देतात.
गोळ्या देतात.
पण ते जाणिवांचा औषध देत असतील.
पण नेणिवेचं काय?
त्याला आहे का काही औषध?
आठवणी....
काही केल्या तरी जात नाहीत मनातून.
तेंव्हा खरा दुःखी होतो माणूस.
काळाचा मलम प्रेम केलेल्या व्यक्तीवरच्या जखमेची भरती नाही करू शकत.
ना कि वेदनेची.
या वेदनेला औषध नाहीच.
म्हणून लोकं एकटी राहत असतात प्रेमात पडल्यावर.
त्यानेही असंच केलं होतं काहीसं वेडं प्रेम.
तेंव्हा तिच्यासाठी समाजाबरोबर दोन हात करायची हिम्मत त्याच्यात नक्कीच वाढली होती.
सगळ्या जगाशी लढण्याची भाषा करणारा तो..
हल्ली गप्प गप्प असतो.
ती गेली...
सारं संपलं. असाच बडबडत असतो तो हल्ली.
परवा त्याच्या कवितांना खूप मोठा पुरस्कार मिळाला.
पण तो गेला नाही कार्यक्रमाला.ना त्याने गाव सोडलं.
तो फक्त इतकंच म्हणत राहिला.
*प्रेम होणं या पेक्षा जगात कुठलाच पुरस्कार मोठा नाही.*
कधी कधी असं बोलून तो ऋषितुल्य वाटायचा मला.
प्रेमात पडल्यावर अर्ध्यात डाव मोडलेल्या कित्येक  व्यक्ती मी जेंव्हा बघतो.
तेंव्हा ते अतृप्त मृतात्म्या सारखे वाटतात मला.
जगात प्रेम आहे रे...
पण ते मिळवायची धमक पाहिजे.
किती सुंदर वाक्य सांगून गेला होता तो दुनियादारी मधला ऍक्टर.
पण कुणाला आजवर खरं प्रेम मिळालंय.?
अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं यशस्वी झाली.
पण बाकीच्यांचं काय?
त्यांनी कुठे मांडावी आपली वेदना...आपलं दुःख.?
सगळं जग प्रेमरोगी झालंय.
तरीही या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
काल तो अचानक गेला.याची जेंव्हा मला खबर मिळाली तेंव्हा...
जेवता जेवता माझा हात आपसूक थांबला.
तसाच हात धुऊन मी त्याच्या घराकडे धावलो.
खूप मोठी गर्दी झालेली.
*त्या गर्दीत त्याच्यासाठी आलेले दर्दी किती होते?*
सांगणं मुश्किल होतं.
त्याची आई...त्याचे बाबा ..त्याच्यासाठी रडत होते.
तेंव्हा मला आतून गलबलून आलं.
*कवीने असं प्रेमात कधीच मरु नये.* त्याला सरणावर घालतांना थरथरलेला त्याच्या बापाचा हात...
माझ्या नजरेतून सुटला नाही.
तो मात्र इथून सुटला.मोकळा झाला मोह मायेतून.
चांगलं झालं त्याचं.
त्याच्या  चितेने पेट घेतल्यावर लोकं माघारी वळली.
*एका कवीच्या अंत्ययात्रेला आली होती ती.*
लोकं फक्त स्मशानापर्यंतच.एव्हढं मात्र नक्की कळलं मला.
आता स्वर्ग वगैरे असला तर त्याची प्रियेसी त्याला मिळेल का?
हा पोरकट प्रश्नही येऊन गेला माझ्या मनात.
मिळेल मिळेल...नक्की मिळायला हवी.
मी आभाळाकडे हात केले.
प्रार्थना केली त्या देवाला.
एका कवीला स्वर्गात सुखरूप घेऊन जा रे बाबा....
आणि.....
काहीतरी अचानक आठवलं म्हणून मी खिशात हात घातला.
त्याच्याच कवितांची चिट्ठी होती ती.
उघडली मी...
वाचून काढली शेवटची..
तेंव्हा सुरेश भट्टांचे काही शब्द आठवले मला...

*इतकेच मला जातांना...*
*सरणावर  कळले होते.*
*मरणाने केली सुटका...*
*जगण्याने छळले होते.*

मी डोळे पुसले.कागद व्यवस्थित घडी केला.
एकवार जळणाऱ्या चितेकडे पाहिलं.
आता ती आग...एका कवीला जाळत होती.
मी अलगद ती चिठ्ठी त्याच्या चितेवर फेकली.
आणि नमस्कार केला.
सूर्य केव्हांच मावळला होता.
आता तो कवी फक्त कवितेच्या रूपाने लोकांच्या मनात जिवंत राहणार होता.
सांजेची छटा क्षितिजावर दिसू लागली होती.
आता मलाही माणसांच्या जगात परत जायचं होतं.
मी उभा राहिलो आणि चालू लागलो मागे न बघता.
चितेने आता मोठयाने पेट घेतली होती.

*दत्तात्रय गुरव.*✍
*संपर्क--८६०५५२३६१८.*
             *७०२८१७५१५८.*


विवाह एक भीषण परिस्थिती...

    पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशव...