' धक्का '
धक्का हा शब्द ऐकून.क्षणभर धक्का बसल्यासारखे वाटतं किंवा दे धक्का चित्रपट आटवला असेल किंवा आपल्याला बसलेला लहानमोठा धक्का आठवला असेल नाहीतर धक्का न लागता काहिही वाटलं नसेल ,अशी आपली अवस्था झाली असेल.पण प्रत्येकाने कुठे ना कुठे धक्का खाल्लेला असेलंच.तसंतर आज अवघं जीवनंच धकाधकीचे झाले आहे .त्यामुळे धक्काच बसत नाही असं काही नाही पण जाणवण्याची संवेदना हरवून बसलो आहोत आपण.
पुर्वी लोक सावकाश, शांत,स्वस्थ,संयमी ,नियम व नियंत्रित जगायची.आजच्याइतकी धावपळ नसायची जगण्यात .त्यामुळे आवर्जुन धक्का देणारे धक्याला बुक्की असे खेळ खेळले जायचे,फार फार तर बंद पडलेले ट्रक, ट्रँक्टर,बस जीप इ.वाहनाना धक्का देताना आम्ही पाहायचो.हां काहीजण ही वेळ येऊ नये म्हणून वाहन बंद करतानाच उताराला उभी करण्याची हुशारी करुन उताराचा धक्का घ्यायची.फँनमध्ये कधी काही बिघाड झाला कि थोडा धक्का काटीच्या सहाय्याने दिला जाई.मग तो फिरायचा,तसा गावचा बाजारहाट,यात्रा,जत्रा सण उत्सवात धक्काबुक्की व्हायची पण वाद व्हायचे नाहीत सहनशीलता बरी होती आज प्रचंड धक्के खात देत आपण जगतो,घराच्या बाहेर पडलो की,धक्का खायची तयारी ठेऊनंच पडावं लागतं,पुणे मुंबई रेल्वे स्टेशन तर आपणास गर्दीच धक्के देत पुढे सारले जातो असंच वाटतं आणि आपल्या सारख्याला गड्या आपला गावंच बरा वाटायला लागतो.हाही एक धक्काच असतो. कारण गावात असताना मुंबई दुरुन फार सुंदर दिसते ना.
आपलं जीवनही सुखदुःखाच्या.धक्यानेच पुढे पुढे जात असते,कधी सुखद,तर.कधी दुःखद, कधी वाहणाच्या धक्यानी आयुष्यातून उठतो तर कधीवेळेवर मिळाल्यानेच जीवन दान मिळते.नोकरी,व्यवसायात अदेक चांगलेवाईट धक्के बसत राहतात.कधी आपलीच माणसं धक्कादायक वागताना दिसतात तर कधी परकी माणसं आपणांस सुखद धक्का देतात.आजचं युग हे धक्याधक्याचं आहे.धक्का म्हणजे मालसामान उतरा यची बंदराची जागा,धक्का म्हणजे नवल वा आश्चर्य,धक्के खाणे म्हणजे अनुभव घेणे,धक्याला लागणे म्हणजे इच्छित स्थळी पोहोचणे.धक्का म्हणजे शॉक ,धक्का म्हणजे अपेक्षित वा अनपेक्षित घटना अकस्मित घडणे होय.असा हा छोटा वाटणारा शब्द कधी दुःखाचा डोंगर आपल्यावर टाकतो,कधी न पचणारी संकंटं देतो तर कधी सुखावून टाकतो.असं म्हणतात तेच खरं.
सुखी स्वस्त मस्त रहायचं,जगायचं असेल तर धक्याला बुक्की चा खेळ न करता बुद्धीचा वापर करून शांत रहा,सुखी रहायचं असेल तर हमरीतुमरीवर न येता पचवाव्या लागतील काही गोष्टी मग असे धक्के फार नाहीत जाणवणार,हाच आहे आपला आजचा धडा वाचा व विचार करा नाहीतर जराजराशा धक्यानी व्यतीत व्हायची वेळ येणार नाही. कारण कोणताही प्रश्न वा परि स्थिती युद्धापेक्षा बुद्ध,कबीर,महावीरांच्या शांतीची गरज आहे.धक्का द्यायला ताकत लागत नाही पचवायला ताकत लागते ती कमवावी लागेल ,हे वाचून कदाचित धक्का बसेल पण सुखी जीवनाचा हा राजमार्ग आहे.करु प्रयत्न जमेल सारं नाहीतर धकाधकीचे जीवनही अधिकच धक्के खात जगावं लागेल ,विचार करा,पदव्या घेताना मिळालेलं ज्ञान व्यहारात आणू या.त्यासाठी एक धक्का स्तःला जरुर द्या व आपली जीवन नौका धक्याला लावा.वाचा विचार चिंतन करा.लागा कामाला....

